Wednesday 29 April 2015

माती विकता येत नाही

तुम्ही म्हणाल," काय हे सारखे राजकारणाविषयी आणि शेतकऱ्यांविषयी लिहिताहेत ? यांच्या पोतडीतल्या प्रेम कविता संपल्या काय ? "
कोणत्याही कवीच्या पोतडीतल्या कविता कधीच संपत नाहीत.
पण होतं काय ठेच लागल्यावर जसं आपल्या तोंडून केवळ आई हाच उद्गार बाहेर पडतो तसाच कवीचा जो अनुभव असेल तशाच कविता मनातल्या कागदावर उमटतात.
शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मी खूप जवळून पहातो आहे. शेतकऱ्यांच्या या अवस्थेला शेतकरी जेवढा कारणीभूत आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी आमचं शासन कारणभूत आहे. शेतकऱ्यांना हवी तेव्हा वीज द्यायची नाही. त्याला मुबलक खतं द्यायची नाहीत. त्याची सबसिडी काढून घ्यायची. त्याच्या शेतमालाला भाव द्यायचा नाही. सहकारानं फायदा कुणाचा झाला असेल तर राजकीय पुढाऱ्यांचा....दलालांचा.....व्यापाऱ्यांचा.
शेतकरी आपला मारतोच आहे कष्ट करून. कितीही कष्ट केले तरी पोटापुरतसुद्धा मिळतं आहे हे पाहून शेतकऱ्याचीही कष्ट करण्याची भावना मरून गेली आहे.
दुग्धव्यवसाय हा शेतीला पूरक आहे म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला दुग्ध व्यवसायाचीही जोड दिली. पण भाव मात्र शासनाच्या ताब्यात. मला आठवतंय लहानपणी तीसऐक वर्षापूर्वी मी जेव्हा मी दुध आणायला जायचो तेव्हा काचेच्या बाटलीतून महाराष्ट्र शासनाच्या दुध केंद्रातून दुध मिळायचं. दुधाच्या बाटलीचं झाकण उघडलं कि झाकणाच्या आतून मलंईचा थर मिळायचा आणि आम्ही एखाद्या सराईत बोक्याप्रमाणे ते झाकण चाटून पुसून साफ करायचो. पण आता शासकीय डेअरीपासून सगळेच दुधातले सगळेच पौष्टिक घटक काढून घेतात. आणि ग्राहकाच्या हाती केवळ पांढर पाणी देतात. दुधातून काढलेल्या मलईपासून पुन्हा श्रीखंड, पनीर, चक्का, तूप, खवा असे वेगवेगळे पदार्थ तयार करून विकतात. श्रीखंडाचा भाव आहे १५० रुपय्र किलो, तूप २५० रुपये किलो, पनीर १०० रुपये किलो, सुगंधी दुध ८० रुपये लिटर................आणि शेतकऱ्याच्या पदरी पडतात लिटर मागे फक्त २० रुपये. मान्य या पुढच्या सगळ्या प्रक्रियांना खूप खर्च येतो. पण हेही तेवढंच खरं आहे कि ही मंडळी ५० ते ६० % नफा पदरी पडून घेतात.
एक गाय महिन्याला साधारणतः ६००० रुपये किमतीचं दुध देते. पण तिचा एका महिन्याचा देखभालीचा खर्च असतो ५००० रुपये. दुखलं खुपलं, दवापाणी एखादं जनावर दगावणं हे आणखी वेगळंच. शिवाय वर्षातून ती केवळ ७ महिनेच दुध देवू शकते. म्हणजे बाकीचे ५ महिने तिला स्वखर्चानं सांभाळाव लागतं.
कसं करायचं शेतकऱ्यानं ?
पण बाकी कुणाचं काय दुखतंय हो ? आमचे पुढारी, दलाल, सहकार खात्यातले अधिकारी सगळे टेचात. म्हणून मी माझ्या
कवितेत म्हणलंय -
दावणीच्या दुभतीला सहकाराचं टोणग पेलं.
पटतंय ना माझं म्हणणं !



4 comments:

  1. संपत घोडेगावकर29 April 2015 at 18:20

    तुमच्या कविता खुप साध्या सोप्या असतात.म्हणुनच समजतात आणि पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात.

    ReplyDelete
    Replies
    1. संपतजी, इतकी भरभरून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप आभार.

      Delete
  2. Replies
    1. आपण कोण आहात कळत नाही. पण अभिप्रायाबद्दल आभार.

      Delete