या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Sunday 8 December 2019
Friday 13 September 2019
Sunday 7 July 2019
अमर्त्यसेन हे भारतरत्न कसे?
मी सचिन आणि रोहितची तुलना करणारी एक तिरकस पोस्ट लिहिली आणि सचिनप्रेमी मंडळींना बरेच वाईट वाटले. म्हणून हे स्पष्टीकरण. खरेतर मी लेखक कवी. मोदी सत्तेत आले काय आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले काय मला काहीच फरक पडायला नको. त्याच प्रमाणे सचिनला भारतरत्न दिले म्हणून मला काहीही फरक पडायचं कारण नाही. परंतु एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्याविषयी लिहायला हवेच ना.
खरेतर मला स्वतःला सचिनविषयी जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम धोनीविषयी आहे. याउपर नेतृत्व गुण यासह इतर
खरेतर मला स्वतःला सचिनविषयी जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम धोनीविषयी आहे. याउपर नेतृत्व गुण यासह इतर
Thursday 4 July 2019
खळाळत्या आयुष्याची धरण गाणी.
जे चांगलं त्यावर चांगलं लिहिताना मला शब्द कमी पडत नाहीत. परंतु आमच्या कवितेची स्तुतीच करा असा कुणाचा आग्रह असेल तर ते शक्य नाही. अलीकडे माझ्याहून थोर मीच अशीच प्रत्येक कवीची भावना असते त्यामुळे कुणावर टीका केली तर ती त्याला रुचत नाही. त्यामुळे अलीकडे लोकांना काय आवडेल खूप भान बाळगावे लागते. मीच नव्हे श्रीपाल सबनीस यांच्या सारखे जेष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा आपल्या अध्यक्षिय भाषणात कसल्याही सुमार पुस्तकावर अतिशय भरभरून बोलतात.
पण कवी गोविंद काळे हे जसे वयाने थोर तसेच अनुभवाने. त्यांचा सखी सांगाती हा काव्यसंग्रह तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे आला. तो वाचून मी त्यावर लिहिले. त्यातली एखादी दुसरी उणीव मी त्यांना दाखवली. ती त्यांनी स्वीकारली. परवा सोलापूरला गेलो होतो. त्यांना फोन केला होता. मी जिथे मुक्कामी होतो तिथे ते आले. भेट झाली आदराने त्यांच्या घरी घेऊन गेले. चहापाणी झालं. आपलं मोठेपण विसरून इतरांचा आदरसत्कार करणारी फार
पण कवी गोविंद काळे हे जसे वयाने थोर तसेच अनुभवाने. त्यांचा सखी सांगाती हा काव्यसंग्रह तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे आला. तो वाचून मी त्यावर लिहिले. त्यातली एखादी दुसरी उणीव मी त्यांना दाखवली. ती त्यांनी स्वीकारली. परवा सोलापूरला गेलो होतो. त्यांना फोन केला होता. मी जिथे मुक्कामी होतो तिथे ते आले. भेट झाली आदराने त्यांच्या घरी घेऊन गेले. चहापाणी झालं. आपलं मोठेपण विसरून इतरांचा आदरसत्कार करणारी फार
Friday 28 June 2019
दुहेरी समाधान
खरंतर वारीचा वारकरी व्हावं. पंढरीला एकदातरी चालत जावं अशी फार मोठी मनीषा होतं. पण देवाच्या भुकेपेक्षा पोटाची भूक मोठी असावी. नौकरी, घर, संसार, मुलांचं भवितव्य यातच गुरफटलो. वारी नाहीच झाली. अर्थात वारीला गेलो तरच पांडुरंग भेटतो असा भाव नाही माझी. वारीला जायचं होतं ते आंतरिक समाधानासाठी. एक अनुभव गाठीशी असावा म्हणून. तसा पांडुरंग प्रत्येक माणसाच्या चांगल्या कर्मात असतोच. पण आपलं कर्म चांगलं कि वाईट हे आपण नाही ठरवावं.
Wednesday 12 June 2019
अभिराज : एक अभिजात संगीतकार
कवी म्हटलं कि कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर यांच्या पलीकडे फारशी नावं माहित नसतातआम्हाला. अपवाद असतील याला. पण माझं विधान सर्वसाधारण आहे. माझ्या सोसायटीतल्या ग्रँज्युएट झालेल्या एका मुलीला मी शिवाजी सावंत माहित आहे का विचारलं, तर तिला छावाकार शिवाजी सावंत यांच्याविषयी काहीही माहित नव्हतं.
संगीतकार म्हटलं कि
संगीतकार म्हटलं कि
मी असाच आहे
बबन धुमाळ यांची गझल मी फेसबुकवर वाचली. संपर्क झाला. बघता बघता ते माझे मित्र झाले. पण मित्र म्हणून स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. माझ्या मित्र यादीत असणाऱ्या ५० एक मित्रांनी मला नारळ दिला. कारण एकच मी त्यांच्या पोस्टवर फारसा जात नाही. त्यांच्या फुटकळ ओळींवर स्तुतीसुमने उधळत नाही. उगाच स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. पण अनेकांना ते रुचत नाही. मग अशी मंडळी मला त्यांच्या मित्र यादीतून बाहेरचा रस्ता दाखवतात. ते
काय करावं या मीडियाचं ?
लोकसभा निवडणुकीदरम्यान मीडिया अत्यंत पक्षपाती काम करत होती. आपण सगळ्यांनी ते अनुभवलं आहे. मोदींची बदनामी करणं आणि राहुल गांधीला लोकशाहीचा तारणहार ठरवणं सुरु होतं. मुद्रित माध्यमं असोत वा दृश्य, एक दोन अपवाद वगळता मोदींना दोष देण्यात सगळ्यांना धन्यता वाटत होती. त्यासाठीच निवडणुका पार पडल्यानंतर Anti Media Forum असा फेसबुक ग्रुप सुरु करावा. आणि
Friday 7 June 2019
सखी सांगाती : एक नाजूक नात्यातला संवाद
मोडनिंब येथील निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण सुमंत, उद्धव कानडे, गोविंद काळे, शिवाजी सलगर अशा अनेक कवींची पहिल्यांदाच गाठभेट झाली. त्यातले उद्धव कानडे हे मला गुरुस्थानी. नारायण सुमंत यांचा लौकिक ऐकून होतो. पण गोविंद काळे, शिवाजी सलगर हे दोघे कवी पहिल्यांदाच भेटले. मला काहीसे सिनिअर. मी ही प्रभातमध्ये लिहीत होतोच. गोविंद काळे यांनी त्यांचा 'सखी सांगाती' हा काव्यसंग्रह माझ्या हाती दिला आणि म्हणाले, 'वाचून पहा. शक्य असेल तर लिहा यावर काही. '
महिना झाला या भेटीला. काव्यसंग्रह वाचून हातावेगळा करणं तसं एका बैठकीचं काम. पण
महिना झाला या भेटीला. काव्यसंग्रह वाचून हातावेगळा करणं तसं एका बैठकीचं काम. पण
दैनिक प्रभात : कोंबड्याची बांग
कोंबड्यानं बांग दिली
मला गं बाई जागं आली
सुपात जोंधळ घोळीते
जात्याव दळण दळिते....
हे गाणं माहित नाही अशी व्यक्ती अभावानेच सापडेल. पण आता कोंबडा, त्याचं आरवणं, कोंबड्याच्या आरवण्यानुसार येणारी जाग, जात्यावरच्या दळणं सगळं काही कालबाह्य झालं आहे. कोंबड्याची बांग. त्यानंतर झुंजूमुंजु होणाऱ्या दिशा. पूर्वेला दिसणारी तांबडी छटा. त्या मागोमाग उगवणारा सूर्य. अंगावर घ्यावीशी वाटणारी रेशीम किरणं. हे सगळं पाहणारे डोळे आता दिसत नाहीत कुठे. उठतात. मनात अविचारांचा कचरा ठेवून देह स्वच्छ करतात. कार्यालयाची वाट धरतात. नाकासमोर बघून चालतात. ऑफिसात पोहचले कि डोळे संगणकात कैद होतात. कान यंत्राच्या खडखडाटात हरवून जातात. संध्याकाळी मलूल झालेल्या किरणांची सुद्धा जाणीव होत नाही त्यांना. अंधार पडतो. रस्त्यावर दिवे लागतात. आणि त्या दिव्यांच्या प्रकाशात डोळे घराची वाट शोधतात. घरट्यात परतात. ताटाकडे बघत दोन घास पोटात ढकलतात. पापण्यांची चादर ओढून झोपून जातात.
काही डोळे सूर्य हातभर वर येऊस्तोवर झोपून राहतात. सूर्य डोळे वटारून त्यांच्याकडे पहात असतो. पण त्यांना त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. नऊ वाजतात. दहा वाजतात. तरी डोळे पापण्यांचं पांघरून ओढून पडून राहतात. कुठून आवाज आले, झोपमोड झाली तर कुरकुर करतात. मोबाईलचे गजर बंद केले जातात. शहरात सिमेंटची खुराडी आहेत. त्या खुराड्यात कोंबडे नाहीत माणसं आहेत. खुराड्यातल्या या माणसांना जाग आल्यावर कोंबड्याची बांग. पाखरांचे किलबिलाट कानावर पडावेसे वाटतात. त्यासाठी मोबाईलवर गजर लावताना मनासारखी रिंगटोन निवडली जाते. गजराच्या वेळेला कधी पाखरांचा किलबिलाट ऐकू येतो. तर कधी कोंबड्याची बांग. पण सगळं काही अनैर्सगिक. पाखरांचा तो चिवचिवाट किलबिलाट पाखरांच्या चोचीतून नव्हे मोबाईलच्या गळ्यातून उमटलेला असतो. कोंबड्याची बांग देणारा कोंबडा नसतोच अवतीभवती गजराची रिंग टोन हुबेहूब तसा आवाज काढते.
हे सगळं लिहिण्याला तसंच कारण घडलं. नुकतीच ‘दैनिक प्रभात’मध्ये बातमी वाचली. ‘महिलेची कोंबड्याविरुद्ध तक्रार’ असाच मथळा. एका महिलेने परिसरात असणाऱ्या कोंबड्याच्या आवाजामुळे झोपमोड झाली म्हणून पोलिसात तक्रार केली. अशा रीतीने झोपमोड झालेल्या महिलेच्या समोर कोणी जातं नेऊन ठेवलं आणि जात्यावरच्या ओव्या म्हणत दळण दळायला सांगितलं तर ती महिला काय करेल याची कल्पना न केलेलीच बरी. मला आणखी एक प्रश्न पडलाय. यात दोष कुणाचा? कोंबड्याचा कि कोंबड्याच्या मालकिणीचा कि कोंबड्याला आरवण्यासाठी गळा देणाऱ्या परमेश्वराचा कि त्या कोंबड्याच्या अधिक्षेत्रात रहिवास करणाऱ्या त्या महिलेचा? कुठं राहायचं हा त्या महिलेचा अधिकार असेल तर कधी आणि किती तीव्रतेने बांग द्यायची हा देखील त्या कोंबड्याच्या अधिकार नाही का? कि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे? पशुपक्षांनी, प्राणिमात्रांनी व्यक्त व्हायचंच नाही का? आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणी गदा आणली तर आम्ही दंड थोपटून त्याला आव्हान देतो. न्यायालयाचे दरवाजे ठोठवतो. मग आता कोंबड्याने सुद्धा पंख थोपटून आव्हान द्यायचे का? न्याय मागायला कोणत्या न्यायालयात जायचे?
हि बातमी आनंददायी नक्कीच नाही. चिंताजनक आहे. माणूस अधिकाधिक आत्मकेंद्री होत चालला आहे. नात्यागोत्यांची, पै-पाहुण्याची वीण उसवत चालली आहे. निसर्ग माणसाला हवा आहे. पण केवळ सुटी पुरता हवा आहे. त्याला हवा असेल तेव्हाच हवा आहे. त्याला जसा हवा तसाच हवा आहे. माणसाला उन्हाळा सोसत नाही तेव्हा तो घराबाहेर पडत नाही. घरातही पंखा लावून बसतो. कुलर लावून बसतो. पावसाळा नको असेल तर डोक्यावर छत्री धरतो. ‘कुठं रोज येतो पाऊस. भिजू या आज’ असं नाही म्हणत. हिवाळा वाढला कि उबदार कपडे घालतो. शेकोटी करून गारठ्याला भीती दाखवतो. तो फिरायला जाईल तेव्हा पाऊस पडावा अशी त्याची अपेक्षा असते. हिरवा निसर्ग पहायला त्याला आवडत पण निसर्ग हिरवा रहावा म्हणून तो काहीच करत नाही. जंगलातले वाघ सिंह माणसांच्या घरापर्यंत आले. माणसावर हल्ले करू लागले. वाघोबांची दहशत आहे. माणूस त्यांना घाबरतो. कारण त्याच्या मानेवर सूरी फिरविण्याची हिंमत नाही माणसात. म्हणून त्याची तक्रार घेऊन कोणी पोलिसात जात नाही. पण कोंबड्याचं काय? वाघाच्या डरकाळीची भीती वाटते. कोंबड्याच्या बांगेला कोण भीक घालतो?
पण खरंतर कोणी कोणाच्या मनाप्रमाणे वागायला हवं? कोणी कोणाला सांभाळून घ्यायला हवं? निसर्ग आहे म्हणून आमचं अस्तिव आहे? कि आम्ही आहोत म्हणून निसर्ग आहे. माणूस हि गरज नाहीच निसर्गाची? माणसालाच निसर्गाची गरज आहे. भगभगत्या उन्हाळ्यात आपण वाटचाल करत असतो. सावलीची गरज भासते. आपण मोठ्या आशेने झाडाचा घेऊ पाहतो. नेमकी त्याच वेळी त्याची सावली काढून घेतली तर काय होईल? किती राग येईल आपल्याला? कोणाला त्रास होईल? माणसालाच ना? रखरखत्या वाळवंटात तहान लागते तेव्हा खिशातल्या पैशाचा उपयोग नाही होत आणि मिळविलेले ज्ञान सुद्धा कामी नाही येत. पाण्याचा झराच शोधावा लागतो.
दुसऱ्याच्या भावनेचा विचार मुळीच करत नाही माणूस. आम्हाला कोंबड्याची बांग त्रासदायक वाटते. पण आमचे उत्सव मात्र आम्ही स्पिकरच्या भिंती रचून साजरे करतो. दुसऱ्याच्या कानाचे दडे बसले तरी त्याची पर्वा नसते आम्हाला. वेळ आलीच तर माणूस माणसाला सहन करेल. पण निर्सगाने मात्र माणसाला हवे तसेच वागायला हवे. 'नाच रे मोरा' म्हटले कि मोराने नाचायला हवे. 'ये रे ये रे पावसा' म्हटले कि पावसाने यायला हवे. आभाळाने पाऊस दिला नाही. झाडाने सावली दिली नाही. वेलींनी फुले दिली नाही, गव्हाच्या ओंब्याला गहूच आले नाही तर काय करेल माणूस? कोंबड्याने बांग दिली नाही म्हणून सूर्य उगवायचा थांबणार नाही. पण म्हणून त्याचा गळा आवळण्याचा आणि त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार कोणी दिला माणसाला?
घंटेवरले फुलपाखरू : प्रकाशनाची हायकूमय संध्याकाळ
जे जे चांगलं त्याविषयी लिहावं अशी माझी भूमिका असते. आजवर मी कायम साहित्यवर्तुळाच्या परिघाबाहेर राहिलो. त्याला अनेक कारणं होती. त्याविषयी इथे बोलणं उचित होणार नाही. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून मी या परिघातला एक बिंदू होण्याचा प्रयत्न करतो आहे. केंद्रबिंदू वगैरे नाही बरं का ! वर्तुळाच्या अवकाशात असतो कुठेतरी मी. अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाला उपस्थित राहिलो. श्रीपाल सबनीस, ह्रद्यनाथ मंगेशकर, अरुणा ढेरे अशा मात्तबर व्यक्त्यांनी मांडलेले विचार ऐकले. काव्यसंग्रहाचं प्रकाशन म्हटलं कि
अभिराज : एक अभिजात संगीतकार
कवी म्हटलं कि कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर यांच्या पलीकडे फारशी नावं माहित नसतातआम्हाला. अपवाद असतील याला. पण माझं विधान सर्वसाधारण आहे. माझ्या सोसायटीतल्या ग्रँज्युएट झालेल्या एका मुलीला मी शिवाजी सावंत माहित आहे का विचारलं, तर तिला छावाकार शिवाजी सावंत यांच्याविषयी काहीही माहित नव्हतं.
संगीतकार म्हटलं कि
संगीतकार म्हटलं कि
Tuesday 4 June 2019
पानापानात आढळणारी चंदनाची फुलेफुले
महिना होऊन गेला असेल. मी आणि गझलकार बबन धुमाळ FC रोडवरील वैशालीत बसलो होतो. दुपारचे दोन वाजले होते. पोटाचे कानेकोपरे काहीतरी चटपटीत हवं म्हणून याचना करत होते. आमी नुकतेच स्थानापन्न झालो होतो. मेनूकार्ड उघडण्याच्या तयारीत होतो. तर समोर जेष्ठ कवी मभा चव्हाण उभे. त्यांच्या सोबत एक स्त्री. क्षणभर मी ओळखलेच नाही. कारण प्रत्यक्ष परिचय नव्हता. फेसबुकवर चेहरा पाहिलेला. मभांना नमस्कार केला आणि त्या स्त्रीकडे वळून म्हणालो, " तुम्ही चंदना सोमाणी का? " त्या म्हणाल्या,"हो." आणि मभांकडे निर्देश करत म्हणाल्या,"आणि हे माझे बाबा."
मभांचा आणि माझा चांगला परिचय आहे. आणि त्यांच्या अत्यंत दर्जेदार कवितेमुळे मला त्यांच्याविषयी मनापासून आदर आहे. पुढे चंदनाच म्हणाल्या,
मभांचा आणि माझा चांगला परिचय आहे. आणि त्यांच्या अत्यंत दर्जेदार कवितेमुळे मला त्यांच्याविषयी मनापासून आदर आहे. पुढे चंदनाच म्हणाल्या,
Wednesday 29 May 2019
सखी सांगाती : एक नाजूक नात्यातला संवाद
मोडनिंब येथील निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण सुमंत, उद्धव कानडे, गोविंद काळे, शिवाजी सलगर अशा अनेक कवींची पहिल्यांदाच गाठभेट झाली. त्यातले उद्धव कानडे हे मला गुरुस्थानी. नारायण सुमंत यांचा लौकिक ऐकून होतो. पण गोविंद काळे, शिवाजी सलगर हे दोघे कवी पहिल्यांदाच भेटले. मला काहीसे सिनिअर. मी ही प्रभातमध्ये लिहीत होतोच. गोविंद काळे यांनी त्यांचा 'सखी सांगाती' हा काव्यसंग्रह माझ्या हाती दिला आणि म्हणाले, 'वाचून पहा. शक्य असेल तर लिहा यावर काही. '
वाहतूक पोलीस कि लुटारू ?
खरंतर या विषयावर खूप लिहून झालं आहे. पण तरीही मी लिहितो आहे. हा फोटो पुण्यातल्याच एका चौकात घेतला आहे. वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस हि शाखा अस्तित्वात आली. पूर्वी चौकाचौकात हात दाखवून वाहतुकीचं नियंत्रण करणारे पोलीस दिसायचे. त्यांच्यासाठी चौकात मध्यभागी स्टँडिंग पोस्ट असायचे. आता ते कुठेच दिसत नाहीत. आणि
Tuesday 2 April 2019
धनुर्मास आणि झुंजूरक भोजन : एक संस्कार With Marathi Star Rahul Solapurkar
सूर्य धनु राशीत प्रवेश करतो. ज्या महिन्यात तो धनु राशीत वास्तव्यास असतो त्या महिन्यास धनुर्मास म्हणतात. त्याला धुंधुरमास असेही म्हणतात. या काळात रात्री मोठ्या असतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. तो जठराग्नी शांत व्हावा म्हणून सकाळी लवकर भोजन करणे गरजेचे असते. तळजाईवर संस्कार भारतीने धनुर्मास साजरा करायचे ठरवले होते. त्यानिमित्त वक्ते धनुर्मासाचे आणि
असा 'मनोहर' होणे नाही No Politician will born like Manohar Parrikar
अलिकडे देशात कोणतीही घटना घडली कि सोशल मिडिया मुळे ती काही क्षणात वाऱ्यासारखी सर्वोमुखी होते. मी काल एका कवी संमेलनात होतो. कवींच्या कविता ऐकता ऐकता सहज फेसबुक ओपन केले तर. मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या अनेक पोस्ट दिसल्या. खरे काय हे जाऊन घेण्यासाठी गुगल केलं. तर condition of Manohar Parrikar is extremely critical असेच दिसले. घरी पोहचलो. टीव्ही बंद होता. ' मनोहर पर्रीकरांचं काय झालं माहित आहे का तुला ? असं पत्नीला विचारलं तर 'गेले’ असं तिने जड स्वरात सांगितलं. घाई घाईने टिव्ही लावला. तर
Wednesday 13 March 2019
Tuesday 12 March 2019
Monday 11 March 2019
Friday 8 March 2019
Tuesday 26 February 2019
Monday 25 February 2019
प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? why successions rate is less in love marriages ?
आमच्या दैनिक प्रभातमध्ये माझा ' प्रेमाचा शिडकावा ' हा लेख प्रकाशित झाला आहे. खरंतर ' प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? ' हे त्या लेखाचं मूळ शिर्षक. कदाचित नकारार्थी संदेश जाईल म्हणून संपादकांनी ते शीर्षक बदललं असावं. परंतु
Thursday 21 February 2019
Wednesday 20 February 2019
#मिशन_मोदी युतीची गरज कुणाला शिवसेनेला कि ..... ?
गेली वर्ष दोन वर्ष विरोधकांसह मिडिया, भाजपला युतीची गरज आहे आणि त्यामुळे भाजपचे सर्व नेते उद्धव ठाकरेंनी केलेला अपमान नाक दाबून गिळत आहेत असे सांगत सुटले होते. भाजप नेते शांत होते. वेळप्रसंगी आशिष शेलार, फडणवीस आणि अमित शहा यांनींही योग्य पलटवार केले आहेतच. पण त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याप्रमाणे
Tuesday 19 February 2019
Sunday 17 February 2019
Thursday 14 February 2019
Wednesday 13 February 2019
Tuesday 5 February 2019
बेकरीला मोदी जबाबदार आहेत का ?
सध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं कि आपण सहज सत्ता मिळवू शकतो असा विरोधकांना ठाम विश्वास आहे. नोटबंदीमुळे उद्योग बुडाले आणि त्यामुळे बेकारी वाढली असा विरोधकांचा दावा आहे. तीनवेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले माननीय विजय दर्डा हे लोकमत वृत्तसमूहाचे सर्वेसर्व्हा आहेत. गरीब सवर्णांना सरकारने आरक्षण दिले तेव्हा, ' आरक्षण वाढले पण नौकऱ्या आहेत कुठे ? ' या मथळ्याखाली लेख लिहिला होता. त्यासंदर्भात मी त्यांना मेल केली होती. त्यातल्या मजकुरावरून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. त्यांना मी जे लिहिले ते असे -
Monday 4 February 2019
#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी
सर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे. मी प्रादेशिक पक्षांना कोणत्याही प्रकारे मतदान करू नये म्हणतो ते याचसाठी. हि प्रादेशिक पक्षांची मंडळी त्यांच्या हितासाठी देश वेठीला धरतील. ममता जे वागल्या
Wednesday 30 January 2019
#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची ?
आज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे असाच अट्टाहास सुरु असतो. काँग्रेनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे सांगितले जाते. पण खरंच काँग्रेस कोणाची ? काँग्रेसला काही ध्येय धोरण उरली आहेत का ?. यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे..
Tuesday 29 January 2019
युवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm
उत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढाईवर केंद्रित झाले होते. एका बाजूला दिल्ली नरेश नेतृत्व करीत होते. तर पूर्वाश्रमीच्या राजघराण्याचे युवराज दुसऱ्या बाजूच्या सैन्यात चैतन्य भरत होते. दोघांनाही ईशान्य आणि दक्षिण वतनात सुरु असलेल्या युद्धात फारसा रस नव्हता. कारण तिकडे कितीही कुमक खर्ची घातली तरी तेथील यश आपल्या पदरी पडणार नाही याची जाणीव त्यांना होती. त्या लढाईत ते सहभागी होते पण काहीही केले तरी तेथील युद्ध त्या त्या वतनातील ठग जिंकणार हे दोघांनाही माहित होते.
पण
पण
Monday 28 January 2019
कोण म्हणतं तीन राज्यात भाजप पराभूत झाली ?
तीन राज्यात भाजपचा पराभव झाला. मिझोराम मधून कांग्रेसची पिछेहाट झाली. के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने तिथे कुणाचीच डाळ शिजू दिली नाही. सर्वच राजकीय अभ्यासकांनी, पत्रकारांनी भाजपाची दमछाक झाल्याचे आणि काँग्रेसने मुसंडी मारल्याचे चित्र निर्माण केले. मुळातच भाजप सत्तेत येण्यापूर्वी भाजपाची तळी उचलून धरणाऱ्या कोणीही पुढे भाजपाची पाठराखण केली नाही. पाठराखण हा शब्द योजताना भाजपच्या चुका डोळ्याआड करायला हव्या होत्या या अर्थाने वापरलेला नाही. परंतु
Sunday 27 January 2019
साहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune
साहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. तरीही खऱ्या अर्थाने मुलाखतकार म्हणूनच ते सर्वदूर परिचित आहेत. जेष्ठ कवी वि. सु.चव्हाण हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. कार्यक्रमाचं वार्तांकन नाही करत मी. मला लिहायचं आहे ते
Saturday 26 January 2019
Friday 25 January 2019
Thursday 24 January 2019
Monday 21 January 2019
#मिशनमोदी : घसरुद्दिन आणि अल्लाउद्दीन why amir, sharukh, slman and nasruddin feel unsafe ?
आम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हातातल्या वर्तमानपत्रावरचं लक्ष उडालं होतं. काही चुकलं का आपलं चार सहा दिवसात ? हा विचार आम्हाला पोखरू लागला होता. पण एवढ्यात तरी बायकोवरील प्रेमाच्या मापात पाप केल्याचे आम्हाला आठवेना. मग आमच्या प्रेमाच्या मेतकूटात माशी पडली कशी
Saturday 19 January 2019
माझ्या ओळखीचे गावं Why do not the children take care of their parents?
मुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्येक आई बाबांचा परीघ. पण मुलांच्या परिघात मात्र बऱ्याचदा आई बाबांना स्थान नसल्याचे दिसते.बऱ्याचदा घरात येणाऱ्या सुनाच याला करणीभूत असतात असंही ही ऐकायला मिळतं. काहीवेळा
Friday 18 January 2019
Thursday 17 January 2019
नवं पुस्तक : शिवारातलं चांदणं : कवी प्रवीण देवरे
प्रवीण देवरे यांचं शिवारातलं चांदणं माझ्या अंगणात पोहचलं त्याला दहा बारा दिवस होऊन गेले. पण त्या चांदण्यात मनसोक्त न्हाऊन निघावं असं वाटत असतानाही ते चांदणं ओंजळीत घ्यायला पुरेसा वेळ मिळत नव्हता. वरवर काव्यसंग्रह वाचून मी लिहू शकलो असतो पण तो माझा स्वभाव नाही. आज कोणी माझ्याकडे आलं तर सरांच्या काव्यसंग्रहात जागोजागी
Wednesday 16 January 2019
Tuesday 15 January 2019
पोलीस, पासपोर्ट आणि कविता ( police, passport and poem )
( सर्वात आधी माझ्या सर्व कवी मित्रांना, रसिक वाचकांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. )
आपल्याविषयी कधी बोलायचं नाही असा माझा शिरस्ता आहे. कारण मी कोण ? एक यकिंचित माणूस. कधीतरी राख होऊन या पंचप्राणांत पुन्हा विलीन होणार. त्यामुळे मी जेव्हा अशी पोस्ट लिहितो तेव्हा ती केवळ कवितेचं मोठेपण कथन करण्यासाठी असते. अनेकजण खूप फुटकळ लिहितात असं मी म्हणतो तेव्हा
Subscribe to:
Posts (Atom)