Sunday 8 December 2019

हिजडे अर्थात तृतीय पंथी


बोटात दहा वीस रुपयाची नोटा अडकवून टाळ्या वाजवत भीक मागणारे तृतीयपंथी सगळ्यांनीच पाहिलेले असतील. काही जणांच्या गलालाही त्यांनी हात लावला असेल. काही जणांचा गलगुच्चा

प्रियांका रेड्डी प्रकरण


प्रियांका रेड्डी या पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या तरुणीवर बलात्कार होतो. तिला जाळून मारण्यात येते. आणि तरीही या देशातील काही मंडळी मानवाधिकाराच्या नावाखाली त्या गुन्हेगारांची पाठराखण करतात. त्या नराधमाची बायको,

दैनिक प्रभात रूपगंध : गळका रांजण

मी गेली वर्षभर दैनिक प्रभातच्या रूपगंध पुरवणीत लेखन करतो आहे. ललित लेखन असं त्या लेखनाचं साधारण स्वरूप. गळका रांजण हा अशाच लेखांपैकी एक लेख. माणसाचं आयुष्य हे देखील

Friday 13 September 2019

marathi kavita : बाप होता आलं पाहिजे

रात्रीचे एक वाजले होते. बरंचसं फेसबुक झोपी गेलं होतं. अगदी तुरळक चार सहा हिरवे दिवे अजूनही जागे आहोत असं सांगत होते. पूर्ण पोस्ट वाचण्यासाठी

Sunday 7 July 2019

वारीचे वारकरी

आजच्या दैनिक प्रभातमधील माझा लेख. फोटोत मी, माझे बंधू आणि ज्ञानराज विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय शेंडगे, उद्योजक आणि वारकरी राजेंद्र वाघ, माझी बहीण नगरसेविका आशा धायगुडे शेंडगे, आणि माझे धाकटे बंधू अविनाश शेंडगे.  

अमर्त्यसेन हे भारतरत्न कसे?

मी सचिन आणि रोहितची तुलना करणारी एक तिरकस पोस्ट लिहिली आणि सचिनप्रेमी मंडळींना बरेच वाईट वाटले. म्हणून हे स्पष्टीकरण. खरेतर मी लेखक कवी. मोदी सत्तेत आले काय आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले काय मला काहीच फरक पडायला नको. त्याच प्रमाणे सचिनला भारतरत्न दिले म्हणून मला काहीही फरक पडायचं कारण नाही. परंतु एखादी गोष्ट चुकीची  घडत असेल तर त्याविषयी लिहायला हवेच ना.

खरेतर मला स्वतःला सचिनविषयी जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम धोनीविषयी आहे. याउपर नेतृत्व गुण यासह इतर

Thursday 4 July 2019

खळाळत्या आयुष्याची धरण गाणी.

जे चांगलं त्यावर चांगलं लिहिताना मला शब्द कमी पडत नाहीत. परंतु आमच्या कवितेची स्तुतीच करा असा कुणाचा आग्रह असेल तर ते शक्य नाही. अलीकडे माझ्याहून थोर मीच अशीच प्रत्येक कवीची भावना असते त्यामुळे कुणावर टीका केली तर ती त्याला रुचत नाही. त्यामुळे अलीकडे लोकांना काय आवडेल खूप भान बाळगावे लागते. मीच नव्हे श्रीपाल सबनीस यांच्या सारखे जेष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा आपल्या अध्यक्षिय भाषणात कसल्याही सुमार पुस्तकावर अतिशय भरभरून बोलतात.

पण कवी गोविंद काळे हे जसे वयाने थोर तसेच अनुभवाने. त्यांचा सखी सांगाती हा काव्यसंग्रह तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे आला. तो वाचून मी त्यावर लिहिले. त्यातली एखादी दुसरी उणीव मी त्यांना दाखवली. ती त्यांनी स्वीकारली. परवा सोलापूरला गेलो होतो. त्यांना फोन केला होता. मी जिथे मुक्कामी होतो तिथे ते आले. भेट झाली आदराने त्यांच्या घरी घेऊन गेले. चहापाणी झालं. आपलं मोठेपण विसरून इतरांचा आदरसत्कार करणारी फार

Friday 28 June 2019

दुहेरी समाधान

खरंतर वारीचा वारकरी व्हावं. पंढरीला एकदातरी चालत जावं अशी फार मोठी मनीषा होतं. पण देवाच्या भुकेपेक्षा पोटाची भूक मोठी असावी. नौकरी, घर, संसार, मुलांचं भवितव्य यातच गुरफटलो. वारी नाहीच झाली. अर्थात वारीला गेलो तरच पांडुरंग भेटतो असा भाव नाही माझी. वारीला जायचं होतं ते आंतरिक समाधानासाठी. एक अनुभव गाठीशी असावा म्हणून. तसा पांडुरंग प्रत्येक माणसाच्या चांगल्या कर्मात असतोच. पण आपलं कर्म चांगलं कि वाईट हे आपण नाही ठरवावं.

Wednesday 12 June 2019

तुम्ही जात मानता का?

या प्रश्नाचं उत्तर बहुतेकजण नाही असंच देतील. तरीही विचारल्यावर प्रत्येकजण आपली जात सांगतोच. मी माणूस आहे असं कोणीच म्हणत नाही. बाबासाहेबांशी नातं सांगणारे प्रकाश आंबेडकर असो, स्वतःला पुरोगामी मानणारे शरद पवार असो अथवा आम्ही पुरोगामी म्हणणारी काँग्रेस असो. प्रत्येकजण

अभिराज : एक अभिजात संगीतकार

कवी म्हटलं कि कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर यांच्या पलीकडे फारशी नावं माहित नसतातआम्हाला. अपवाद असतील याला. पण माझं विधान सर्वसाधारण आहे. माझ्या सोसायटीतल्या ग्रँज्युएट झालेल्या एका मुलीला मी शिवाजी सावंत माहित आहे का विचारलं, तर तिला छावाकार शिवाजी सावंत यांच्याविषयी काहीही माहित नव्हतं.

संगीतकार म्हटलं कि

मी असाच आहे

बबन धुमाळ यांची गझल मी फेसबुकवर वाचली. संपर्क झाला. बघता बघता ते माझे मित्र झाले. पण मित्र म्हणून स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. माझ्या मित्र यादीत असणाऱ्या ५० एक मित्रांनी मला नारळ दिला. कारण एकच मी त्यांच्या पोस्टवर फारसा जात नाही. त्यांच्या फुटकळ ओळींवर स्तुतीसुमने उधळत नाही. उगाच स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. पण अनेकांना ते रुचत नाही. मग अशी मंडळी मला त्यांच्या मित्र यादीतून बाहेरचा रस्ता दाखवतात. ते

काय करावं या मीडियाचं ?

लोकसभा निवडणुकीदरम्यान मीडिया अत्यंत पक्षपाती काम करत होती.  आपण सगळ्यांनी ते अनुभवलं आहे. मोदींची बदनामी करणं आणि राहुल गांधीला लोकशाहीचा तारणहार ठरवणं सुरु होतं. मुद्रित माध्यमं असोत वा दृश्य, एक दोन अपवाद वगळता मोदींना दोष देण्यात सगळ्यांना धन्यता वाटत होती. त्यासाठीच निवडणुका पार पडल्यानंतर Anti Media Forum असा फेसबुक ग्रुप सुरु करावा. आणि

Friday 7 June 2019

सखी सांगाती : एक नाजूक नात्यातला संवाद

मोडनिंब येथील निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण सुमंत, उद्धव कानडे, गोविंद काळे, शिवाजी सलगर अशा अनेक कवींची पहिल्यांदाच गाठभेट झाली. त्यातले उद्धव कानडे हे मला गुरुस्थानी. नारायण सुमंत यांचा लौकिक ऐकून होतो. पण  गोविंद काळे, शिवाजी सलगर हे दोघे कवी पहिल्यांदाच भेटले. मला काहीसे सिनिअर. मी ही प्रभातमध्ये लिहीत होतोच. गोविंद काळे यांनी त्यांचा 'सखी सांगाती' हा काव्यसंग्रह माझ्या हाती दिला आणि म्हणाले, 'वाचून पहा. शक्य असेल तर लिहा यावर काही. '

महिना झाला या भेटीला. काव्यसंग्रह वाचून हातावेगळा करणं  तसं एका बैठकीचं काम. पण

दैनिक प्रभात : कोंबड्याची बांग



कोंबड्यानं बांग दिली 
मला गं बाई जागं आली 
सुपात जोंधळ घोळीते 
जात्याव दळण दळिते....

हे गाणं माहित नाही अशी व्यक्ती अभावानेच सापडेल. पण आता कोंबडा, त्याचं आरवणं, कोंबड्याच्या आरवण्यानुसार येणारी जाग, जात्यावरच्या दळणं सगळं काही कालबाह्य झालं आहे. कोंबड्याची बांग. त्यानंतर झुंजूमुंजु होणाऱ्या दिशा. पूर्वेला दिसणारी तांबडी छटा. त्या मागोमाग उगवणारा सूर्य. अंगावर घ्यावीशी वाटणारी रेशीम किरणं. हे सगळं पाहणारे डोळे आता दिसत नाहीत कुठे. उठतात. मनात अविचारांचा कचरा ठेवून देह स्वच्छ करतात. कार्यालयाची वाट धरतात. नाकासमोर बघून चालतात. ऑफिसात पोहचले कि डोळे संगणकात कैद होतात. कान यंत्राच्या खडखडाटात हरवून जातात. संध्याकाळी मलूल झालेल्या किरणांची सुद्धा जाणीव होत नाही त्यांना. अंधार पडतो. रस्त्यावर दिवे लागतात. आणि त्या दिव्यांच्या प्रकाशात डोळे घराची वाट शोधतात. घरट्यात परतात. ताटाकडे बघत दोन घास पोटात ढकलतात. पापण्यांची चादर ओढून झोपून जातात.

काही डोळे सूर्य हातभर वर येऊस्तोवर झोपून राहतात. सूर्य डोळे वटारून त्यांच्याकडे पहात असतो. पण त्यांना त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. नऊ वाजतात. दहा वाजतात. तरी डोळे पापण्यांचं पांघरून ओढून पडून राहतात. कुठून आवाज आले, झोपमोड झाली तर कुरकुर करतात. मोबाईलचे गजर बंद केले जातात. शहरात सिमेंटची खुराडी आहेत. त्या खुराड्यात कोंबडे नाहीत माणसं आहेत. खुराड्यातल्या या माणसांना जाग आल्यावर कोंबड्याची बांग. पाखरांचे किलबिलाट कानावर पडावेसे वाटतात. त्यासाठी मोबाईलवर गजर लावताना मनासारखी रिंगटोन निवडली जाते. गजराच्या वेळेला कधी पाखरांचा किलबिलाट ऐकू येतो. तर कधी कोंबड्याची बांग. पण सगळं काही अनैर्सगिक. पाखरांचा तो चिवचिवाट किलबिलाट पाखरांच्या चोचीतून नव्हे मोबाईलच्या गळ्यातून उमटलेला असतो. कोंबड्याची बांग देणारा कोंबडा नसतोच अवतीभवती गजराची रिंग टोन हुबेहूब तसा आवाज काढते.

हे सगळं लिहिण्याला तसंच कारण घडलं. नुकतीच ‘दैनिक प्रभात’मध्ये बातमी वाचली. ‘महिलेची कोंबड्याविरुद्ध तक्रार’ असाच मथळा. एका महिलेने परिसरात असणाऱ्या कोंबड्याच्या आवाजामुळे झोपमोड झाली म्हणून पोलिसात तक्रार केली. अशा रीतीने झोपमोड झालेल्या महिलेच्या समोर कोणी जातं नेऊन ठेवलं आणि जात्यावरच्या ओव्या म्हणत दळण दळायला सांगितलं तर ती महिला काय करेल याची कल्पना न केलेलीच बरी. मला आणखी एक प्रश्न पडलाय. यात दोष कुणाचा? कोंबड्याचा कि कोंबड्याच्या मालकिणीचा कि कोंबड्याला आरवण्यासाठी गळा देणाऱ्या परमेश्वराचा कि त्या कोंबड्याच्या अधिक्षेत्रात रहिवास करणाऱ्या त्या महिलेचा? कुठं राहायचं हा त्या महिलेचा अधिकार असेल तर कधी आणि किती तीव्रतेने बांग द्यायची हा देखील त्या कोंबड्याच्या अधिकार नाही का? कि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे? पशुपक्षांनी, प्राणिमात्रांनी व्यक्त व्हायचंच नाही का? आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणी गदा आणली तर आम्ही दंड थोपटून त्याला आव्हान देतो. न्यायालयाचे दरवाजे ठोठवतो. मग आता कोंबड्याने सुद्धा पंख थोपटून आव्हान द्यायचे का? न्याय मागायला कोणत्या न्यायालयात जायचे?

हि बातमी आनंददायी नक्कीच नाही. चिंताजनक आहे. माणूस अधिकाधिक आत्मकेंद्री होत चालला आहे. नात्यागोत्यांची, पै-पाहुण्याची वीण उसवत चालली आहे. निसर्ग माणसाला हवा आहे. पण केवळ सुटी पुरता हवा आहे. त्याला हवा असेल तेव्हाच हवा आहे. त्याला जसा हवा तसाच हवा आहे. माणसाला उन्हाळा सोसत नाही तेव्हा तो घराबाहेर पडत नाही. घरातही पंखा लावून बसतो. कुलर लावून बसतो. पावसाळा नको असेल तर डोक्यावर छत्री धरतो. ‘कुठं रोज येतो पाऊस. भिजू या आज’ असं नाही म्हणत. हिवाळा वाढला कि उबदार कपडे घालतो. शेकोटी करून गारठ्याला भीती दाखवतो. तो फिरायला जाईल तेव्हा पाऊस पडावा अशी त्याची अपेक्षा असते. हिरवा निसर्ग पहायला त्याला आवडत पण निसर्ग हिरवा रहावा म्हणून तो काहीच करत नाही. जंगलातले वाघ सिंह माणसांच्या घरापर्यंत आले. माणसावर हल्ले करू लागले. वाघोबांची दहशत आहे. माणूस त्यांना घाबरतो. कारण त्याच्या मानेवर सूरी फिरविण्याची हिंमत नाही माणसात. म्हणून त्याची तक्रार घेऊन कोणी पोलिसात जात नाही. पण कोंबड्याचं काय? वाघाच्या डरकाळीची भीती वाटते. कोंबड्याच्या बांगेला कोण भीक घालतो?

पण खरंतर कोणी कोणाच्या मनाप्रमाणे वागायला हवं? कोणी कोणाला सांभाळून घ्यायला हवं? निसर्ग आहे म्हणून आमचं अस्तिव आहे? कि आम्ही आहोत म्हणून निसर्ग आहे. माणूस हि गरज नाहीच निसर्गाची? माणसालाच निसर्गाची गरज आहे. भगभगत्या उन्हाळ्यात आपण वाटचाल करत असतो. सावलीची गरज भासते. आपण मोठ्या आशेने झाडाचा घेऊ पाहतो. नेमकी त्याच वेळी त्याची सावली काढून घेतली तर काय होईल? किती राग येईल आपल्याला? कोणाला त्रास होईल? माणसालाच ना? रखरखत्या वाळवंटात तहान लागते तेव्हा खिशातल्या पैशाचा उपयोग नाही होत आणि मिळविलेले ज्ञान सुद्धा कामी नाही येत. पाण्याचा झराच शोधावा लागतो.

दुसऱ्याच्या भावनेचा विचार मुळीच करत नाही माणूस. आम्हाला कोंबड्याची बांग त्रासदायक वाटते. पण आमचे उत्सव मात्र आम्ही स्पिकरच्या भिंती रचून साजरे करतो. दुसऱ्याच्या कानाचे दडे बसले तरी त्याची पर्वा नसते आम्हाला. वेळ आलीच तर माणूस माणसाला सहन करेल. पण निर्सगाने मात्र माणसाला हवे तसेच वागायला हवे. 'नाच रे मोरा' म्हटले कि मोराने नाचायला हवे. 'ये रे ये रे पावसा' म्हटले कि पावसाने यायला हवे. आभाळाने पाऊस दिला नाही. झाडाने सावली दिली नाही. वेलींनी फुले दिली नाही, गव्हाच्या ओंब्याला गहूच आले नाही तर काय करेल माणूस? कोंबड्याने बांग दिली नाही म्हणून सूर्य उगवायचा थांबणार नाही. पण म्हणून त्याचा गळा आवळण्याचा आणि त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार कोणी दिला माणसाला?

घंटेवरले फुलपाखरू : प्रकाशनाची हायकूमय संध्याकाळ

जे जे चांगलं त्याविषयी लिहावं अशी माझी भूमिका असते. आजवर मी कायम साहित्यवर्तुळाच्या परिघाबाहेर राहिलो. त्याला अनेक कारणं होती. त्याविषयी इथे बोलणं उचित होणार नाही. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून मी या परिघातला एक बिंदू होण्याचा प्रयत्न करतो आहे. केंद्रबिंदू वगैरे नाही बरं का ! वर्तुळाच्या अवकाशात असतो कुठेतरी मी. अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाला उपस्थित राहिलो. श्रीपाल सबनीस, ह्रद्यनाथ मंगेशकर, अरुणा ढेरे अशा मात्तबर व्यक्त्यांनी मांडलेले विचार ऐकले. काव्यसंग्रहाचं प्रकाशन म्हटलं कि

अभिराज : एक अभिजात संगीतकार

कवी म्हटलं कि कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर यांच्या पलीकडे फारशी नावं माहित नसतातआम्हाला. अपवाद असतील याला. पण माझं विधान सर्वसाधारण आहे. माझ्या सोसायटीतल्या ग्रँज्युएट झालेल्या एका मुलीला मी शिवाजी सावंत माहित आहे का विचारलं, तर तिला छावाकार शिवाजी सावंत यांच्याविषयी काहीही माहित नव्हतं.

संगीतकार म्हटलं कि

Tuesday 4 June 2019

पानापानात आढळणारी चंदनाची फुलेफुले

महिना होऊन गेला असेल. मी आणि गझलकार बबन धुमाळ FC रोडवरील वैशालीत बसलो होतो. दुपारचे दोन वाजले होते. पोटाचे कानेकोपरे काहीतरी चटपटीत हवं म्हणून याचना करत होते. आमी नुकतेच स्थानापन्न झालो होतो. मेनूकार्ड उघडण्याच्या तयारीत होतो. तर समोर जेष्ठ कवी मभा चव्हाण उभे. त्यांच्या सोबत एक स्त्री. क्षणभर मी ओळखलेच नाही. कारण प्रत्यक्ष परिचय नव्हता. फेसबुकवर चेहरा पाहिलेला. मभांना नमस्कार केला आणि त्या स्त्रीकडे वळून म्हणालो, " तुम्ही चंदना सोमाणी का? " त्या म्हणाल्या,"हो." आणि मभांकडे निर्देश करत म्हणाल्या,"आणि हे माझे बाबा."

मभांचा आणि माझा चांगला परिचय आहे. आणि त्यांच्या अत्यंत दर्जेदार कवितेमुळे मला त्यांच्याविषयी मनापासून आदर आहे. पुढे चंदनाच म्हणाल्या,

Wednesday 29 May 2019

सखी सांगाती : एक नाजूक नात्यातला संवाद

मोडनिंब येथील निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण सुमंत, उद्धव कानडे, गोविंद काळे, शिवाजी सलगर अशा अनेक कवींची पहिल्यांदाच गाठभेट झाली. त्यातले उद्धव कानडे हे मला गुरुस्थानी. नारायण सुमंत यांचा लौकिक ऐकून होतो. पण  गोविंद काळे, शिवाजी सलगर हे दोघे कवी पहिल्यांदाच भेटले. मला काहीसे सिनिअर. मी ही प्रभातमध्ये लिहीत होतोच. गोविंद काळे यांनी त्यांचा 'सखी सांगाती' हा काव्यसंग्रह माझ्या हाती दिला आणि म्हणाले, 'वाचून पहा. शक्य असेल तर लिहा यावर काही. '

वाहतूक पोलीस कि लुटारू ?


खरंतर या विषयावर खूप लिहून झालं आहे. पण तरीही मी लिहितो आहे. हा फोटो पुण्यातल्याच एका चौकात घेतला आहे. वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस हि शाखा अस्तित्वात आली. पूर्वी चौकाचौकात हात दाखवून वाहतुकीचं नियंत्रण करणारे पोलीस दिसायचे. त्यांच्यासाठी चौकात मध्यभागी स्टँडिंग पोस्ट असायचे. आता ते कुठेच दिसत नाहीत. आणि

Tuesday 2 April 2019

धनुर्मास आणि झुंजूरक भोजन : एक संस्कार With Marathi Star Rahul Solapurkar

सूर्य धनु राशीत प्रवेश करतो. ज्या महिन्यात तो धनु राशीत वास्तव्यास असतो त्या महिन्यास धनुर्मास म्हणतात. त्याला धुंधुरमास असेही म्हणतात. या काळात रात्री मोठ्या असतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. तो जठराग्नी शांत व्हावा म्हणून सकाळी लवकर भोजन करणे गरजेचे असते.  तळजाईवर संस्कार भारतीने धनुर्मास साजरा करायचे ठरवले होते. त्यानिमित्त वक्ते धनुर्मासाचे आणि

असा 'मनोहर' होणे नाही No Politician will born like Manohar Parrikar

अलिकडे देशात कोणतीही घटना घडली कि सोशल मिडिया मुळे ती काही क्षणात वाऱ्यासारखी सर्वोमुखी होते. मी काल एका कवी संमेलनात होतो. कवींच्या कविता ऐकता ऐकता सहज फेसबुक ओपन केले तर. मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या अनेक पोस्ट दिसल्या. खरे काय हे जाऊन घेण्यासाठी गुगल केलं. तर condition of Manohar Parrikar is extremely critical असेच दिसले. घरी पोहचलो. टीव्ही बंद होता. ' मनोहर पर्रीकरांचं काय झालं माहित आहे का तुला ? असं पत्नीला विचारलं तर 'गेले’ असं तिने जड स्वरात सांगितलं. घाई घाईने टिव्ही लावला. तर

कवितेचे दोन दिवस Two days of poem


२३ आणि २४ मार्च हे दोन दिवस म्हणजे पुणेकर साहित्यरसिकांसाठी पर्वणी ठरली. हे दोन दिवस SM जोशी हॉलला सांस्कृतिक नगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या वास्तूने दोन दिवस रसिकांची मांदियाळी अनुभवली. लेकुरवाळा विठू होऊन कलाकारांना,

Wednesday 13 March 2019

#मिशन_मोदी : फक्त भाजपचं या देशाला दिशा देऊ शकतो ? only BJP can give direction to country

bjp, congress, narendra modi, rahul gandhi,
महिना झालं मी मिशन मोदी हा टॅग घेऊन पोस्ट लिहितो आहे. पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर झाल्या. लेख आवडणारे अभिप्राय जसे आले तसेच लेखावर नकारात्मक प्रतिक्रिया नोंदविणारे अभिप्राय सुद्धा आले. नकारात्मक अभिप्राय नोंदविणाऱ्या मंडळींची खाती चाळली.

प्रेम करावं असं का वाटतं ? Why do you want to love someone?

love, friendship, young couple, young generation, tin age
प्रेम हि गोष्ट खूप सुखदायी आहे. पण ते हवं तसं मिळालं. त्याने मनावर फुंकर घालण्याचं काम केलं तरच. अन्यथा रेम हे जीवघेणंच. प्रेमात आत्महत्या केल्याच्या खूप घटना आपण ऐकतो, पाहतो, वाचतो. अशी वेळ का येते ?

Tuesday 12 March 2019

#मिशन_मोदी : खिचडी सरकार म्हणजे स्थिरता नव्हे

narendr modi, ajit pawar, sharad pwar, nda, upa,
अवघ्या पंधरा दिवसापूर्वीची घटना. पुण्यात एक पुरस्कार प्रदान समारंभ होता. शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मी कार्यक्रम स्थळी पोहचलो तर चार सहा खंदे कार्यकर्ते तिथे हजर होते. म्हणाले,"आज कार्यक्रम रद्द झालेला आहे. पवारसाहेब येऊ शकणार नाहीत कार्यक्रमाला."

म्हटलं,"का ?"

Monday 11 March 2019

#मिशन_मोदी : यातल्या घराणेशाहीवर बोट कोण ठेवणार ? why parth pawar ?

politics, ajit pawar, parth pawar, narendr modi, ncp
पार्थ पवार निवडणूक लढवणार हे सगळ्यांनाच माहित होतं. काय तर म्हणे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पार्थला तिकीट देणे भाग आहे. पण कार्यकर्ते कोण

Friday 8 March 2019

#मिशन_मोदी : देशाच्या अधोगतीला केवळ काँग्रेस जबाबदार ?

narendra modi, rahul gandhi, soniya gandhi, bjp, congress
काँग्रेस आजवर देशाची दिशाभूल करीत आली आहे. आणि असे करताना देशाला अत्यंत बिकट वळणावर नेऊन ठेवले आहे. कधीकाळी शाळेत असताना नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी हरित क्रांती ( शेतीविषयक ) आणि धवल क्रांती ( दुग्ध विषयक ) केल्याचे सांगितले जात असे. पण

Tuesday 26 February 2019

#मोदी_मिशन : राज ठाकरे सारखे राज्यकर्ते हेच खरे देशद्रोही. - rulers like Raj Thackeray are the true traitors

narendra modi, rahul gandhi, pulvama attack, raj thakre, ,
मागचे पाच सहा दिवस खूपच धावपळीत होतो. मनात असूनही पोस्ट करू शकलो नाही. पुलवामा हल्ला घडला आणि विरोधकांचा आत्मविश्वास ढासळला. आपण जीवाचा आटापिटा करून रान उठवले. तत्व गुंडाळून ठेवून आघाड्या केल्या. आणि

Monday 25 February 2019

प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? why successions rate is less in love marriages ?

आमच्या दैनिक प्रभातमध्ये माझा ' प्रेमाचा शिडकावा ' हा लेख प्रकाशित झाला आहे. खरंतर ' प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? ' हे त्या लेखाचं मूळ शिर्षक. कदाचित नकारार्थी संदेश जाईल म्हणून संपादकांनी ते शीर्षक बदललं असावं. परंतु

Thursday 21 February 2019

#मिशन_मोदी : उद्या शिवसेना पंतप्रधानपद सुद्धा मागेल

dewendra fadnvis, udhhaw thakre, bjp, shiwsena, narendra modi
( आणखी एक गोष्ट स्पष्ट करावीशी मी इथे जी व्यंगचित्रे पोस्ट करतो ती सर्व मी नेटवरून घेतलेली असतात. परंतु ती मी जशीच्या तशी शक्यतो पोस्ट करत नाही. त्यात माझ्या पोस्टच्या गरजेनुसार बदल केलेले असतात. )

परवा भाजप - शिवसेना युती झाली. काल मी त्यावर पोस्ट लिहिली. तेव्हा

Wednesday 20 February 2019

#मिशन_मोदी युतीची गरज कुणाला शिवसेनेला कि ..... ?

narendra modi, udhhaw thakre, bjp, shivsena, loksbha 2019
गेली वर्ष दोन वर्ष विरोधकांसह मिडिया, भाजपला युतीची गरज आहे आणि त्यामुळे भाजपचे सर्व नेते उद्धव ठाकरेंनी केलेला अपमान नाक दाबून गिळत आहेत असे सांगत सुटले होते. भाजप नेते शांत होते. वेळप्रसंगी आशिष शेलार, फडणवीस आणि अमित शहा यांनींही योग्य पलटवार केले आहेतच. पण त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याप्रमाणे

Tuesday 19 February 2019

हे कसलं शिवप्रेम ? Is it the respect about Chatrapti Shivaji Maharaj ?

shiwaji maharaj, chatrapti shiwaji, hindawi rajy, छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य
काल भगवे झेंडे लावून गाड्या फिरवणारे तरुण पाहिले आणि शिवजयंती आल्याची जाणीव झाली. आज फेसबुक चाळले तर शिवरायांवर पोस्ट नाही असा मावळा सापडेना. धन्य झाल्यासारखे वाटले.

सकाळी सकाळी चिरंजीव आले. म्हणाले, " ते शिवाजी महाराजांचं स्टेटस ठेवणं गरजेचं आहे का ? " आणि

७ वे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन


मित्र हो,

२० फेब्रुवारी २०१९ ते २४ फेब्रुवारी २०१९ असे सलग पाच दिवस पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने ७ वे अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिका

Sunday 17 February 2019

#मिशन_मोदी : काय करायचं असल्या लोकांचं ?

narendra modi, rahul gandhi, pulwama incident, surgical strike
पुलवामा हल्ला झाला. सगळ्या देशाने हळहळ व्यक्त केली. आज एका निमंत्रितांच्या कवी संमेलनाला गेलो होतो. पुलवामा हल्ल्या संदर्भात अनेक कवींनी आपल्या भावना शब्दातून व्यक्त केल्या. आठ दहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.

प्रेम विवाह करावा की करू नये

love, friendship, girl friend, marriage , love marriage, boy and girlदैनिक प्रभातमधील प्रकाशित माझा लेख.

८० % प्रेम यशस्वी होत नाहीत एका अभ्यास गटाचं अवलोकन आहे. प्रेम ही ठरवून करण्याची गोष्ट नाही असे आपण म्हणतो. पण

Thursday 14 February 2019

#मिशन_मोदी : कोण म्हणतो भाजपमध्ये घराणेशाही आहे काय ?

narendra modi, rahul gandhi, manmohan sing,
२०१४ ला भाजप आणि मोदींना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या मिडियाने आता मात्र मोदींना केवळ पाण्यात पहायचे ठरवले आहे. काही झालं तरी मोदींच्या आणि भाजपच्या कोणत्याही कृतीत नकारात्मकता कशी शोधायची याचं या पत्रकारांना खास ट्रेनिंग देण्यात आलं असं दिसतं. आणि

Wednesday 13 February 2019

#मिशन_मोदी : देशाची अस्मिता विकू नका

narendra modi, rahul gandhi, ashutosh gupta, priyanka gandi,
आमच्या पत्रकारिता किती पोरकट आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पत्रकार आशुतोष गुप्ता. आशुतोष गुप्ता कोण हे अनेकांना माहित नसेल. हा एकेकाळचा हिंदी वृत्त वाहिन्यांचा संपादक. पुढे नौकरी सोडली आणि आम आदमी पार्टीत दाखल झाला. एकेकाळी

#मिशन_मोदी : प्रियांकाचं कर्तृत्व काय ?

maymrathi blogspot com ,  narendra modi, priyanka gadhi, rahul gandhi,
प्रियांका गांधी यांनी काँग्रेसचे सरचिटणीस पद सांभाळले म्हणून देशात फार मोठी उलथा पालथ होणार अशा अविर्भावात सर्व पत्रकार आणि मीडिया वावरते आहे. मी माझ्या पोस्टमध्ये जनतेविषयी फार नाही बोलत. कारण आमच्या ३० % जनतेला स्वतःच मत नाही. बातम्या पाहून, पेपर वाचून आणि विरोधक जे काही बोलतात त्यावरून या

Tuesday 5 February 2019

बेकरीला मोदी जबाबदार आहेत का ?

सध्या शेतकरी, बेकारी  विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना  केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं कि आपण सहज सत्ता मिळवू शकतो असा विरोधकांना ठाम विश्वास आहे. नोटबंदीमुळे उद्योग बुडाले आणि त्यामुळे बेकारी वाढली असा विरोधकांचा दावा आहे. तीनवेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले माननीय विजय दर्डा हे लोकमत वृत्तसमूहाचे सर्वेसर्व्हा आहेत. गरीब सवर्णांना सरकारने आरक्षण दिले तेव्हा, ' आरक्षण वाढले पण नौकऱ्या आहेत कुठे ? ' या मथळ्याखाली लेख लिहिला होता. त्यासंदर्भात मी त्यांना मेल केली होती. त्यातल्या मजकुरावरून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. त्यांना मी जे लिहिले ते असे -

Monday 4 February 2019

#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी

narendra modi, rahul gandhi
सर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे. मी प्रादेशिक पक्षांना कोणत्याही प्रकारे मतदान करू नये म्हणतो ते याचसाठी. हि प्रादेशिक पक्षांची मंडळी त्यांच्या हितासाठी देश वेठीला धरतील. ममता जे वागल्या

Wednesday 30 January 2019

#मिशन_मोदी : काँग्रेस खरी कुणाची ?

narendra modi, rahul gandhi, priyanka wadra
आज काँग्रेस हि गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे समीकरण झाले आहे. आणि काहीही करून सत्ता गांधी घराण्याच्या हातात राहिली पाहिजे असाच अट्टाहास सुरु असतो. काँग्रेनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे सांगितले जाते. पण खरंच काँग्रेस कोणाची ? काँग्रेसला काही ध्येय धोरण उरली आहेत का ?. यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.. 

Tuesday 29 January 2019

युवराज आणि ईव्हीएम मशीन rahul gandhi, evm

modi, rahul gandhi
उत्तरेकडील तीन वतनात घमासान युद्ध सुरू होते. ईशान्य आणि दक्षिणेची दोन वतने देखील या युद्धात सामील होती. पण रयतेचे लक्ष केवळ उत्तरेकडील लढाईवर केंद्रित झाले होते. एका बाजूला दिल्ली नरेश नेतृत्व करीत होते. तर पूर्वाश्रमीच्या राजघराण्याचे युवराज दुसऱ्या बाजूच्या सैन्यात चैतन्य भरत होते. दोघांनाही ईशान्य आणि दक्षिण वतनात सुरु असलेल्या युद्धात फारसा रस नव्हता. कारण तिकडे कितीही कुमक खर्ची घातली तरी तेथील यश आपल्या पदरी पडणार नाही याची जाणीव त्यांना होती. त्या लढाईत ते सहभागी होते पण काहीही केले तरी तेथील युद्ध त्या त्या वतनातील ठग जिंकणार हे दोघांनाही माहित होते.

पण

Monday 28 January 2019

कोण म्हणतं तीन राज्यात भाजप पराभूत झाली ?

rahul gandhi
तीन राज्यात भाजपचा पराभव झाला. मिझोराम मधून कांग्रेसची पिछेहाट झाली. के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने तिथे कुणाचीच डाळ शिजू दिली नाही. सर्वच राजकीय अभ्यासकांनी, पत्रकारांनी भाजपाची दमछाक झाल्याचे आणि काँग्रेसने मुसंडी मारल्याचे चित्र निर्माण केले. मुळातच भाजप सत्तेत येण्यापूर्वी भाजपाची तळी उचलून धरणाऱ्या कोणीही पुढे भाजपाची पाठराखण केली नाही. पाठराखण हा शब्द योजताना भाजपच्या चुका डोळ्याआड करायला हव्या होत्या या अर्थाने वापरलेला नाही. परंतु

Sunday 27 January 2019

साहित्यादीपच प्रतिष्ठान : आदर्शाचा मापदंड sahityadip foundation , pune

maymarathi.blogspot.com
साहित्यादीपचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने पार पडला. माननीय सुधीरजी गाडगीळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. तरीही खऱ्या अर्थाने मुलाखतकार म्हणूनच ते सर्वदूर परिचित आहेत. जेष्ठ कवी वि. सु.चव्हाण हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. कार्यक्रमाचं वार्तांकन नाही करत मी. मला लिहायचं आहे ते

Saturday 26 January 2019

#मिशनमोदी : मोबाईलमधला सरकारी दूत

modi, rahul,
आम्ही उठलो. स्नानादी उरकलं. देवपूजा आटोपली. बैठकीवर बैठक जमवली. मोबाईल हाती घेतला. व्हाट्सअप सुरु केलं. तर दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या प्रदीप भिडे सारखा माणूस आम्हाला आमच्या मोबाईलच्या स्क्रिनवर दिसला. नेमकं काय झालं असेल याचा विचार करत आम्ही डोळे विस्फारून मोबाईलच्या स्क्रीनकडे पहात होतो. तेवढ्यात

Friday 25 January 2019

#मिशनमोदी : साईज सुजा आणि ईव्हीएम मशीन


said suja, evm, rahul gandhi
खरंतर विकास या बाबींवर मला काही लेख लिहायचे आहेत. कारण आपल्या देशात प्रत्येक पत्रकार, प्रत्येक मिडिया, प्रत्येक विचारवंत केवळ कोण काय बोलतो आहे यावरच चर्चा करतो आहे. कारण सगळ्यांनाच माहिती आहे कि आपली जनता स्वतःच्या बुद्धीने विचार करीत नाही.

Thursday 24 January 2019

का जाळावा अथवा पुरावा मृत देह ?

तिकडे यवतमाळ येथे साहित्याचा उत्सव सुरु होता आणि इकडे पुण्यात काही साहित्यिक मंडळींनी एक आगवेगळा सत्कार आयोजित केला होता. प्रमोद आडकरांचं निमंत्रण आलं होतं म्हणून कार्यक्रमाला हजर राहिलो. कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप माहित नव्हतं.

Monday 21 January 2019

#मिशनमोदी : घसरुद्दिन आणि अल्लाउद्दीन why amir, sharukh, slman and nasruddin feel unsafe ?

आम्ही वर्तमानपत्र चाळत चहाची वाट पहात होतो. पण आज का कुणास ठाऊक चहाने उशीर केला होता. सकाळी सकाळी किचनमध्ये आदळआपट चालली होती. आमचं हातातल्या वर्तमानपत्रावरचं लक्ष उडालं होतं. काही चुकलं का आपलं चार सहा दिवसात ? हा विचार आम्हाला पोखरू लागला होता. पण एवढ्यात तरी बायकोवरील प्रेमाच्या मापात पाप केल्याचे आम्हाला आठवेना. मग आमच्या प्रेमाच्या मेतकूटात माशी पडली कशी

Saturday 19 January 2019

माझ्या ओळखीचे गावं Why do not the children take care of their parents?

Marathi poem,
मुले दूर गेलेल्या, ज्यांच्या मुलांना आई वडिलांचा विसर पडलेला आहे अशा आईवडिलांची अगतिकता मी माझ्या एका कवितेत मांडली आहे. मुलं हीच प्रत्येक आई बाबांचा परीघ. पण मुलांच्या परिघात मात्र बऱ्याचदा आई बाबांना स्थान नसल्याचे दिसते.बऱ्याचदा घरात येणाऱ्या सुनाच याला करणीभूत असतात असंही ही ऐकायला मिळतं. काहीवेळा

Friday 18 January 2019

#मिशनमोदी : मजबूर सरकार मजबूत देश can Uddhaw Thakre explain how stable country is possible without stable government )

uddhaw thakre
उद्धव ठाकरे यांच्याविषयी लिहायचं नाही फारसं असं ठरवलं होतं. कारण नाही म्हटलं तरी यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पंचवीस वर्ष भाजप सोबत संसार केला आहे. पण

Thursday 17 January 2019

नवं पुस्तक : शिवारातलं चांदणं : कवी प्रवीण देवरे

नवं पुस्तक : शिवरातलं चांदणं : कवी प्रवीण देवरे
 
प्रवीण देवरे यांचं शिवारातलं चांदणं माझ्या अंगणात पोहचलं त्याला दहा बारा दिवस होऊन गेले. पण त्या चांदण्यात मनसोक्त न्हाऊन निघावं असं वाटत असतानाही ते चांदणं ओंजळीत घ्यायला पुरेसा वेळ मिळत नव्हता. वरवर काव्यसंग्रह वाचून मी लिहू शकलो असतो पण तो माझा स्वभाव नाही. आज कोणी माझ्याकडे आलं तर सरांच्या काव्यसंग्रहात जागोजागी

Wednesday 16 January 2019

#मिशनमोदी : जानवं, तुळशीची माळ मटणाचं ताट ? ( narendra modi, rahul gandhi )

काही दिवसापूर्वी राहुल गांधींनी हिंदू मंदिरात जाऊन आपण हिंदुत्ववादी आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. धडाकाच लावला होता हिंदू मंदिरांना भेटी  देण्याचा. सोमनाथ येथील मंदिरातील भेट पुस्तिकेत नोंद करताना राहुल गांधी यांची नॉन हिंदू

Tuesday 15 January 2019

पोलीस, पासपोर्ट आणि कविता ( police, passport and poem )


( सर्वात आधी माझ्या सर्व कवी मित्रांना, रसिक वाचकांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. )

आपल्याविषयी कधी बोलायचं नाही असा माझा शिरस्ता आहे. कारण मी कोण ? एक यकिंचित माणूस. कधीतरी राख होऊन या पंचप्राणांत पुन्हा विलीन होणार. त्यामुळे मी जेव्हा अशी पोस्ट लिहितो तेव्हा ती केवळ कवितेचं मोठेपण कथन करण्यासाठी असते. अनेकजण खूप फुटकळ लिहितात असं मी म्हणतो तेव्हा