Sunday 12 April 2020

चारोळी म्हणजे काय?

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी

मी खूप खूप वर्षापूर्वी लिहिलेली हि चारोळी. चारोळी म्हणजे काय? हे हि मला तेव्हा फारसं ठाऊकही नव्हतं. 'एकाखाली एक अशा चार ओळी लिहिल्या म्हणजे
झाली चारोळी.' असं एक माझं मत होतं. 

आजही बहुतेकजण या एकाच हेतूने आणि विचाराने चारोळी लिहितात. कल्पनांचा फारसा पसारा मांडवा लागत नाही. विषय आणि आशय फारसा तणावा लागत नाही. एकदम इनस्टंट फूड सारखं. एकाखाली एक अशा चार ओळी लिहायच्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक साधायचं. बस झाली चारोळी.

पण खरचं चारोळी इतकी सोपी नाही. चारोळी लिहिणं म्हणजे तांदळाच्या दाण्यावर रामायण लिहण्यासारखं आहे . खपू मोठा आशय घेऊन येण्याऱ्या मोजक्याच ओळी म्हणजे चारोळी. हि चारोळीची मला भावलेली व्याख्या.
रॉय किणीकरांच्या रुबाया या मला समविचारी चारोळीची गुंफण वाटते. गझलेतला प्रत्येक शेर जसा स्वतंत्र कविता असू शकतो. तशाच रॉय किणीकरांच्या रुबायांमधील प्रत्येक चारोळी म्हणजे एक स्वतंत्र विचार वाटतो. 

उदाहरण म्हणून सांगतो. त्यांच्या एका कवितेत ते म्हणतात  -

कीर्तनात गातो माझी माय विठाई 
फिरवितो तिला जणू बाजारातील बाई 
ते तोडा मंदिर फोडून टाका मूर्ती 
लखलाभ असो भडव्यांना ती अपकीर्ती.  

आपण अवतीभोवती पाहतो तेव्हा आपल्याला जाणवत हे जग फार फार स्वार्थी आहे. इतकं कि बऱ्याचदा माणसाला आपलं थोडं सुद्धा वाईट झालेलं नको असत. पण इतरांच चांगलं झालेलही पाहवत नाही. थोडी फार मोजकी माणसं त्याला अपवाद असतातही किवा आहेतच. पण बहुतांश लोक हे नागवेच असतात. हे नागवेपण विचारांचं असतं, कृतीच असतं, एखाद्याचे पैसे घ्यायचे आणि द्यायचेच नाहीत असं व्यावहारिक नागवेपण सुद्धा असतं अनेकांकडे. हि वैचारिक नागवेपण असणारी माणसं दुसऱ्याच्या दुःखात स्वतःच सुख शोधतात. कित्येक लोक तर असे असतात कि त्यांना फक्त स्वतःच्या सुखातच रस असतो इतरांचं काही होवो त्यांना काही घेणंदेणं नसतं. काही माणसा इतरांना स्वतःच्या मनाचा कधीही थांग लागू देत नाहीत. आणि आपल्या मात्र अशाच माणसांवर प्रेम करत रहाण्याशिवाय पर्याय नसतो.

अशी हि वृत्तीनं नागवी असलेली माणसं, त्याचं भलं होत नाही तेव्हा दुसऱ्यांचहि भलं होऊ देत नाहीत.
जग असं खूप वाईट असला तरी चांगली माणसही खूप होवून गेली आहेत या जगात. त्यात संत ज्ञानेश्वर, संत गाडगे महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज, मदर तेरेसा अशी अनेक नवा घेता येतील.

चांगली माणस जशी होऊन गेली तशी आजही काही चांगली माणसं आहेत. पण चांगल्या माणसांच्या अंगावर चिखलफेक करणारे कमी नाहीत. चिखलफेक करणारी हि मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगावर चिखल फ़ेकतातच. परंतु नरेंद्र मोदींचे हे देशाचे पंतप्रधान आहेत याचाही भान या स्वतः शेणात लोळणाऱ्या माणसांना नसतं. 

चांगल्या माणसांच्या सहवासात राहून, आपणही चांगल वागावं असं या मंडळींना वाटत नाही. उलट अशी अनेक मंडळी एक होतात आणि चांगल्या माणसाला वाईट ठरवतात. तीन अट्टल दारूबाजांनी चौथ्याला दारू प्यायला फशी पाडाव तसं. अशा वृत्तीच्या लोकांसाठी लिहिलेल्या या ओळी. चारोळी.

मित्रहो जग हे असं आहे. स्वतः नागवं आहे म्हणून अंगभर कपडे असणाऱ्या माणसाला नागवं करणारं. अशा या जगात आपण आपला चांगुलपणा टिकवून धरायला हवा. एवढंच सांगायचय मला.

ओळी अगदी साध्या सोप्या आहेत. पहा आवडतात का ते - 

नागव्यांच्या बाजारात 
मी ....... लंगोट्या विकायला घेऊन गेलो. 

पण त्यांनी.... लंगोट्या नाही विकत घेतल्या 
मला नागवे केले.

2 comments:

  1. चारोळी काय ते आपण अत्यंत समर्पक शब्दात मांडले आहे. मी पण चारोळ्या लिहिण्याचा छोटासा प्रयत्न करत आहो. माझ्या चारोळ्यांना एकदा नक्की भेट द्या, धन्यवाद.

    ब्लॉग लिंक:- https://shabdjhep.blogspot.com/

    ReplyDelete
  2. अनिकेतजी, अभिप्रायाबद्दल. मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या ब्लॉगला सुद्धा भेट दिली. आणि तुमच्या चारोळ्या वाचून आपण अधिक अभ्यास करायला हवे असे वाटले. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात १० बारा चारोळ्या लिहिल्या आहेत. माझी चारोळीची व्याख्या आपण पहिली आहेच. अधिक गांभीर्याने लेखन करावे.

    ReplyDelete